Aryan Khan Drugs Case : आर्यन खान केस प्रकरणी समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा | पुढारी

Aryan Khan Drugs Case : आर्यन खान केस प्रकरणी समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) सीबीआयने केलेल्या कारवाई विरोधात एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली होती. या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालायाने समीर वानखेडे यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने सीबीआयला सोमवार पर्यंत वानखेडे यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश दिला आहे.

आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज केस प्रकरणात सीबीआयने एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर कारवाई केली होती. ही कारवाई बदलापोटी आणि सूड भावनेने केलील असल्याचे म्हणत समीर वानखेडे यांनी सदरची कारवाई रोखण्याबाबत मुंबई उच्चन्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी (दि.१९) दुपारी अडीचच्या सुमारास पार पडली. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा देत सीबीआयला सोमवार पर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. (Aryan Khan Drugs Case)

याबाबत उच्च न्यायालायाने समीर वानखेडे यांच्या अटक करण्यासारखी कारवाई करण्यात येऊ नये. यावेळी समीर वानखेडे यांनी न्यायालयास सांगितले की, मी तपासात मदत करण्यास तयार असून २० मे रोजी चौकशीसाठी सीबीआयच्या कार्यालयात हजर राहिन. यावर न्यायालयाने सीबीआयला सांगितले की ते तपासात सहकार्य करण्यास तयार आहेत त्यामुळे २२ मे पर्यंत त्यांच्यावर अटकेसारखी कारवाई करण्यात येऊ नये. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खान कडून समीर वानखेडे यांनी लाच घेतल्याचा आरोप सीबीआयने वानखेडे यांच्यावर ठेवला आहे. (Aryan Khan Drugs Case)

आर्यनला २ ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने टाकलेल्या छाप्यानंतर अटक करण्यात आली होती. अटकेच्या २५ दिवसांनंतर त्यांला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास NCB मुंबईने केला होता. पण नंतर ६ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रकरणाचा तपास SIT कडे देण्यात आला होता. SIT ने या प्रकरणाचा तपास वस्तुनिष्ठ पद्धतीने केला. या प्रकरणात एकूण 20 जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. त्यात आर्यन खान-अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचा समावेश होता. या प्रकरणी आर्यन खानला 27 मे 2022 ला क्लिन चिट मिळाली.

दरम्यान, या कारवाईत आर्यन खान याला ठरवून टार्गेट करण्यात आले होते. तसेच एनसीबीचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यन खान याचे नाव प्रसिद्धीसाठी गोवले, असा आरोपही करण्यात आला होता. तसेच याच प्रकरणी समीर वानखेडे यांनी आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणातून सोडविण्यासाठी 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.

त्यानुसार समीर वानखेडे यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. समीर वानखेडे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांवर प्रत्येकी 25 लाखांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, याप्रकरणी 12 मे रोजी सीबीआयने दिल्ली, रांची आणि कानपूर येथे छापेमारी केली होती. त्यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्या मुंबईच्या घरात सीबीआयने छापा टाकला होता.

सीबीआयच्या या कारवाई विरोधात समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. बदलापोटी ही कारवाई केली जात असल्याचा दावा याचिकेत केला होता.

अधिक वाचा :

Back to top button