पुणे : हिमालयीन भागासह उत्तर भारतात जोरदार थंडी सुरू झाली आहे. या भागाकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून थांबलेली थंडी पुन्हा सुरू होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मंदौस चक्रीवादळाचा परिणाम ओसरल्यानंतर आता मंगळवारपासून (दि. 20) राज्यात पहाटेच्या किमान तापमानात घट होऊन 10 अंश सेल्सिअसपर्यंत, तर दुपारच्या कमाल तापमानातही घट होऊन 29 अंश सेल्सिअसवर स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील उर्वरित 10-12 दिवसांत थंडीत वाढ होणार असून, 31 डिसेंबरपर्यंत थंडी राहण्याची शक्यता आहे.