तासगाव : प्रमोद चव्हाण तासगावमध्ये यावर्षीच्या नवीन बेदाण्याचे सौदे सुरू झाले आहेत. या बेदाण्याचे पूजन करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकर्यांनी कष्टाने द्राक्षे पिकवून बनवलेल्या बेदाण्याची उधळण करुन नेहमीप्रमाणे हजारो रुपयांचा बेदाणा पायदळी तुडवला गेला. याचवेळी बाजार समितीच्या प्रशासकीय अधिकार्यांच्या हस्ते या बेदाण्याचे पूजन करुन त्यांच्यासमोरच बेदाण्याची उधळण करण्यात आल्याने शेतकर्यांच्या मालाला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तासगावचा बेदाणा देशभरात प्रसिद्ध आहे. या बेदाण्याला त्याच्या विशिष्ट गोडीमुळे विशेष मागणी आहे. पन्नास रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत हा बेदाणा प्रति किलो विकला जातो. शेतकऱ्याने तळहाताच्या फोडाप्रमाणे द्राक्षबाग जगवुन त्यातून बेदाणा तयार करून शेवटी कवडीमोल दराने व्यापाऱ्यांना विकायचा, आणि तोही बेदाणा विक्री करताना व्यापारी सौद्यावेळी उधळून पायदळी तुडवतात.ही परिस्थिती वर्षानुवर्षे चालत आलेली आहे.
या सांडलेल्या बेदाण्यातून या व्यापाऱ्यांनी दरवर्षाला किमान 30 ते 50 लाख रुपये मिळवले आहेत. मात्र प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे आजही शेतकऱ्यांचे या प्रकारातून मोठे नुकसान होत आहे.
याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी या प्रकाराविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. मात्र प्रशासकीय अधिकार्यांच्यासमोरच जर बेदाणा उधळून पायदळी तुडवला जात असेल, तर याबाबत दाद मागायची तरी कोणाकडे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा :