गणेश विसर्जनानंतर बारामती‌ येथून ‘विसर्जना’ची प्रक्रीया सुरू : किरीट सोमय्या

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रवक्‍ते किरीट सोमय्या.
पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रवक्‍ते किरीट सोमय्या.

पुणे; पुढारी वृत्तसेवा: भाजप प्रवक्‍ते किरीट सोमय्या यांनी येथे आयाेजित पत्रकार परिषदेत राष्‍ट्रवादीसह राज्‍य सरकारवर हल्‍लाबाेल केला.राज्य सरकारच गुंडांचे आणि घोटाळेबाजांचे आहे, त्यामुळे ईडी आणि आमचे काम वाढले आहे. सरकारमधील नेते घोटाळ्यांमध्ये सापडत असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार घाबरले आहेत. त्यामुळेच‌ ते घोटाळेबाजांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. लवकरच तिसऱ्या घोटाळेबाज अनिलचे नाव जाहीर करणार असून गणेश विसर्जनानंतर बारामती‌ येथून विसर्जनाची प्रक्रीया सुरू होणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी आज दिला.

पुणे श्रमिक पत्रकार‌ संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी ठाकरे सरकारसह राष्‍ट्रवादीवर घणाघाती हल्ला
केला.यावेळी खासदार गिरीष बापट, आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व इतर नेते उपस्थित होते.

सोमय्या म्हणाले, शरद पवार भावना गवळी यांना निर्दोष जाहीर करून ईडी सूडबुद्धीने काम करत असल्याचा आरोप करत आहेत. मात्र गवळी यांच्याकडे एवढी रक्कम आली कुठून, एक खासदार कोट्यवधी रुपये बँक खात्यातून ट्रान्फर करते कसे, सात कोटी चोरी गेल्याची‌ तक्रार दहा महिन्यानंतर कशी देतात, या प्रश्नांची उत्तरे पवार यांनी द्यावीत.

पुढील आठवड्यात मी ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याचा घोटाळा बाहेर काढून ठाकरे सरकारचे पितळ उघडे पडणार आहे, असेही सोमय्या म्हणाले.

सातारा कोरेगाव येथील जरंडेश्वर कारखाना विरोधकांनी ६५ कोटींना विकत घेतला आणि कर्ज ७०० कोटी घेतले याला कर्ज फक्त 100 कोटी मिळू शकते, असेही ते म्हणाले. या कारखान्याचे व्हॅल्यूएशन कसे‌ केल, असाही सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला.

हेही वाचलं का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news