कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज दुपारी २:०० वाजताच्या ताज्या आकडेवारीनुसार राजाराम बंधारा पाणी पातळी ४८ फुट ३ इंच इतकी आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे. जिल्ह्यातील एकुण पाण्याखालील बंधारे ७६ आहेत.
दुसरीकडे राधानगरी धरणाचे 3 दरवाजे बंद झाले आहेत. सध्या केवळ एक स्वयंचलित दरवाजा सुरु आहे.
अधिक वाचा
पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील बुधले मंगल कार्यालयाजवळ महामार्गावर महापूराचे पाणी ओसरल्याने ३ दिवसांनंतर वाहतूक सुरू झाली आहे.
आज (सोमवारी) सकाळी १० वाजता प्रथम अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली. तसेच अत्यावश्यक वाहने कोल्हापूरच्या दिशेने सोडण्यात आली. सकाळी ७ वाजता रस्तावर प्रात्यक्षिक घेण्यात आली.
पोकलँंड आणि जेसीबीसारख्या अवजड वाहने प्रथमतः प्रात्यक्षिक घेण्यात आली. त्यानंतरच रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याची खात्री केल्यानंतर वाहतुकींसाठी महामार्ग सुरू करण्यात आला.
पाहा व्हिडिओ – पूरग्रस्तांना बोटींमार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा | Flood Rescue Operation