पुढारी ऑनलाईन डेस्क : चंद्र नसता तर पृथ्वीचे काय झाले असते याचा विचार केला असता काहीच झालं नसतं असं आपल्याला वाटेल. कारण सर्वच ग्रहांना काही चंद्र नाहीत. बुध आणि शुक्र यांना चंद्र नाहीत. मंगळाभोवती काही छोटे मृत्तिकाखंड घिरट्या घालतात. पण त्यांना चंद्र म्हणता येणार नाही. तेव्हा पृथ्वीलाही चंद्र नसता तर काय बिघडलं असतं ? बरंच काही. कारण चंद्र नसता तर पृथ्वीचंही आजचं स्वरूप राहिलं नसतं.
हेही वाचा