![भाजपमधील घराणेशाहीवर राहुल गांधींचा हल्लाबोल, “अमित शहांचा मुलगा…”](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2FRaga.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (दि.१७) भाजपमधील घराणेशााहीवर हल्लाबोल केला. मिझारोम दौर्यावर असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी राहुल गांधी म्हणाले की, "सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा नेमकं काय करतो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह याचा मुलगा काय करतो? मला माहिती मिळाले आहे की, अमित शहा यांचा मुलगा भारतीय क्रिकेट चालवत आहे. भाजपचे अनेक अनुराग ठाकुर यांच्यासारखी मुले ही घराणेशाहीतूनच आली आहेत."
मिझोरामधील लोकांना मला एक संदेश द्यायचा आहे, काँग्रेस पक्षाकडे एक निवडणूक कार्यक्रम आहे, असेही ते म्हणाले. 'जेव्हा आपण संस्कृती, धर्म यांच्यावर हल्ला करतो, तेव्हा त्या हल्ल्याचे सूत्रधार भाजपसारखाच पक्ष असतो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
भाजप विरोधी राजकीय पक्षांची इंडिया आघाडी देशाच्या ६० टक्के भागाचे प्रतिनिधित्व करत आहे. भारताची मूल्ये, घटनात्मक चौकट आणि स्वातंत्र्य यांचे रक्षणासाठी ही आघाडी कार्यरत आहे. आम्ही अधिकार्यांच्या विकेंद्रीकरणावर विश्वास ठेवतो. तर सर्व निर्णय दिल्लीतच व्हायला हवेत, असे भाजपचे मत आहे. त्याचवेळी भारतावर एका विचारधारेने आणि संघटनेने राज्य केले पाहिजे, असे आरएसएसचे मत आहे. याला आमचा विरोध आहे, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा :