विराट-गंभीर एकमेकांना नेमकं काय बोलले? प्रत्‍यक्षदर्शीने सांगितले वादाचे कारण…

विराट-गंभीर एकमेकांना नेमकं काय बोलले? प्रत्‍यक्षदर्शीने सांगितले वादाचे कारण…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्‍पर्धेत सोमवारी ( दि. १ ) लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) यांच्यातील सामना अनेक कारणांनी चर्चेत राहिला. या सामन्‍यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांमध्‍ये झालेला वाद सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. आता या दोघांमध्‍ये नेमकी काय वादावादी झाली याबाबत संघातीलच एका प्रत्‍यक्षदर्शीने 'पीटीआय' वृत्तसंस्‍थेला दिलेली माहिती समोर आली आहे. ( Virat-Gambhir Fight )

प्रत्‍यक्षदर्शीने 'पीटीआय' दिलेल्‍या माहितीनुसार, लखनौ संघाचा फलंदाज केली मेयर्स यांच्‍यात चर्चा झाली. मेयर्स याने विराटला विचारणा केली की, तू सतत गैरवर्तन का करत आहेस. यापूर्वी लखनौचा गोलंदाज अमित मिश्रा याने कोहली
सातत्‍याने नवीन-उल-हक शिवीगाळ करत असल्‍याची तक्रार पंचांकडे केली होती.

Virat-Gambhir Fight : तू माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केली आहेस…

प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले की, "विराट कोहली याने मेयर्सवर टिप्पणी केली. याची दखल गौतम गंभीर याने घेतली. त्‍याने विराटच्‍या दिशेने चाल केली. यावेळी त्‍याला मेयर्सने आपल्या बाजूने खेचले. यावेळी गंभीर याने कोहलीला विचारले की. तू काय बोलत आहेस? यावर मी तुझ्‍याबद्‍दल काहीच बोलत नाही. तू वाद स्‍वत:वर का ओढावून घेत आहेत, असा सवाल विराटने केला. यावर गंभीरने उत्तर दिले की, "तू माझ्या खेळाडूशी बोलला आहेस, म्हणजे तू माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केली आहेस; यावर विराट प्रत्‍युत्तर दिले की, 'तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा.' यावेळी अमित मिश्रासह इतर खेळाडूंनी मध्‍यस्‍ती करत हा वाद थांवला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news