शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज अहमदनगर जिल्हा दौर्यावर असून ते शिर्डीतीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके वाया गेली आहेत. त्या पिकांची पाहणी करण्यासाठी ठाकरे यांनी उत्तर नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन पिक पाहणी केली. शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत करावी अशी मागणी ही करण्यात आली.
यावेळी ठाकरेंनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यांनीही आपले प्रश्न ठाकरेंसमोर मांडले. यावेळी उद्धव ठाकरे संगमनेर, कोपरगाव, राहता तालुक्यातील पुणतांबा तसेच शिर्डी येथे शेतकऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. यावेळी खासदार संजय राऊत, विनायक राऊत, तालुका अध्यक्ष सचिन कोते, शहराध्यक्ष संजय शिंदे आदिसह पदाधिकारी उपस्थित आहेत.
हेही वाचा