पुढारी ऑनलाईन: संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेश केल्याबद्दल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांचा मंत्रीमंडळात केलेला समावेश अत्यंत दुदैवी असल्याचे चित्रा वाघ यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे.
भाजपतच्या चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " पूजा चव्हाण हिच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. संजय राठोड विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.