पुढारी ऑनलाईन डेस्क : बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहुल बजाज नेहमी आपल्या कार्याने आणि विचारांनी देशाला प्रेरणा देत राहिले. त्यांचे आचरण करत भारतातील अनेक नवउद्योजकांनी आपल्या भविष्याला आकार दिला. बजाज समुहाला त्यांनी सर्वोच्च शिखरा पर्यंत पोहचवले.
राहूल बजाज (Rahul Bajaj) यांनी पाच दशकांहून अधिक काळ बजाज समुहाचे नेतृत्व केले. 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे नातू होते. युपीएचे सरकार असताना ते राज्यसभेचे सदस्य होते. देशाच्या आर्थिक संकटाच्या काळात, मंदीच्या काळात त्यांनी सरकारला व देशाला मार्गदर्शन केले. उद्योग जगतासह सामाजिक, राजकीय क्षेत्रात आदराने त्यांचे नाव घेतले जात असे. त्यांनी त्याच्या मार्गदर्शनातून अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचे विचार आज आपणास मार्ग दाखवतात. त्यांनी दिलेले हे दहा विचार महत्त्वाचे विचार.
राहूल बजाज यांचे दहा प्रेरणादायी विचार (Rahul Bajaj)