भगतसिंह कोश्यारी खोटं बोलतायत; त्‍यांनी घटनात्‍मक कर्तव्य का पाळलं नाही? : संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन महाराष्‍ट्राचे माजी राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे सरकारने विधान परिषदेसाठी शिफारस केलेली बारा सदस्यांची यादी जाहीर करण्यासाठी आपल्‍यावर पत्रातून दबाव टाकण्यात आला होता. तुम्‍ही राज्‍यपालांना कायदे शिकवता म्‍हणत त्‍यांनी शेवटपर्यत बारा सदस्‍यांची यादी जाहीर केली नव्हती. त्‍यावर आज संजय राऊत यांनी बोलताना कोश्यारी हे खोटं बोलत आहेत. कॅबिनेटची शिफारस ७२ तासात मंजूर करायची असते, तुम्‍ही ती का केली नाही असा प्रतिप्रश्न उपस्‍थित केला. तसेच माजी राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे प्रचारक म्‍हणूनच कार्य करत होते अशी टीका त्‍यांच्यावर केली.

दरम्‍यान आज ठाकरे गटाकडून पक्षाचे नावे आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्‍यावर आजपासून सुनावणी होणार आहे. त्‍यावर बोलताना राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय हा देशातील जनतेसाठी आणि लोकशाहीसाठी आशेचा किरण आहे. म्‍हणूनच आम्‍ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. निवडणूक आयोगाने एकतर्फी आणि अन्यायकारक निर्णय घेतलेला आहे. आयोगाने हा निर्णय दडपशाही, सत्‍ता आणि पैशाच्या आधारे दिला आहे. २ हजार कोटींचे पॅकेज या निर्णयासाठी वापरल्‍याचा खळबळजनक आरोप त्‍यांनी केला आहे.

शिवसेनेच्या कार्यालयांवरील शिंदे गटाच्या ताब्‍यावर बोलताना तुम्‍ही सरकारी कार्यालये घ्‍या, पण जी जनता पेटून उठली आहे त्‍यांच्यावर कसे ताबा मिळवणार असा सवाल केला. राज्‍यातील जनता निवडणूक आयोगाच्या निर्णयाने पेटून उठली आहे. शिवसेना महाराष्‍ट्राचा आत्‍मा आहे. ती कोणी संपवू शकत नाही अशी भूमीका त्‍यांनी मांडली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news