पुढारी ऑनलाईन डेस्क : खारघरमध्ये १६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर तेथे श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना कशी घडली, हिंमत असेल तर सांगा, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर प्रश्नांची सरबत्ती करत सरकारवर निशाणा साधला. यावेळी राऊत पुढे म्हणाले, तुम्ही फक्त बेईमानाच्या चिपळ्या वाजवत आहात. लाईट अॅन्ड शेडस कंपनीत भागीदार कोण आहे? खारघर दुर्घटनेत मृतांचा आकडा जास्त आहे. हा आकडा वाढू शकतो. या लोकांना उन्हात फायद्यासाठी उपाशी ठेवले. त्यांना सावलीची सोय केली नाही. मुळात आयोजकांना जगाला ड्रोनच्या माध्यमातून दाखवायचे होते की, किती गर्दी आहे, असा आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केला. (Sanjay Raut)