मुंबई ; पुढारी ऑनलाईन महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. भाजप महाराष्ट्रात अतिरेक्यांप्रमाणे कारवाया करत आहे. याकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष आहे. त्यामुळे कायदेशीर मार्गाने ज्यांच्या कॉलरला हात घालायचा आहे तो घालणारचं अस मोठं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
महाराष्ट्रात ठाकरे सरकार कायद्यान चालत आहे. अशावेळी भाजपकडून यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. राज्यातील काही कारवायांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही लक्ष आहे. भाजपला जशाच तसे उत्तर द्यायला हवं.
मुख्यमंत्री नाराज असल्याची अफवा विरोधकांनी पसरवली. भाजपला यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये उत्तम संवाद आहे. मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र भाजपकडून मुख्यमंत्री नाराज असल्याची अफवा पसरवली जात आहे. त्यामध्ये तथ्य नाही.
मुख्यमंत्री पदासाठीच भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली. महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षांच सरकार आहे. तीन्ही पक्ष आपल्या-आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडत आहेत. केंद्राच्या कोणत्याही दबावापुढे आम्ही झुकणार नाही. कायदेशीर मार्गाने ज्यांच्या कॉलरला हात घालायचा आहे तो घालणारच अशी रोखठोक भूमिका संजय राऊत यांनी मांडली.