अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात आहे. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पुढे सलग 48 दिवस मंडल पूजा चालणार आहे. मंडल पूजेचे चलन दक्षिण भारतातून आहे. उत्तर भारतात ही प्रथा पाळली जात नाही. अयोध्येतील रामलल्ला मात्र याबाबतीत उत्तर भारत-दक्षिण भारताच्या ऐक्याचे प्रतीक ठरणार आहे.
सात हजार विशेष पाहुणे, चार हजार संत, जगभरातील 50 देशांतील निमंत्रित तसेच सर्व राज्यांतील मिळून जवळपास 20 हजार लोक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावतील. प्राणप्रतिष्ठेची ही गर्दी ओसरल्यानंतर 24 जानेवारीपासून मंडल पूजा सुरू होईल. ती 48 दिवस चालेल. (Ram Mandir)
तत्पूर्वी 23 जानेवारीपासूनच सामान्य भाविक रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतील. महत्त्वाचे म्हणजे मंडल पूजा हा उत्तर भारतात फारसा कुणाला माहिती नसलेला विधी आहे. हा विधी दक्षिण भारतात आवर्जून पार पाडला जातो. अयोध्येत ही पूजा तीर्थ क्षेत्राचे संन्यासी आणि पेजावर मठ पीठाधीश्वर जगद्गुरू माध्वाचार्य विश्व प्रसन्न तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. (Ram Mandir)
मंडल पूजेत काय?
हेही वाचा :