Kiren Rijiju: ‘राहुल गांधी देशासाठी धोकादायक’; मंत्री रिजिजू यांचा हल्लाबोल

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू Vs काँग्रेस नेते राहुल गांधी
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू Vs काँग्रेस नेते राहुल गांधी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी हे भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी हे देशासाठी धोकादायक आहेत, पण हे परदेशातील नागरिकांना माहित नाही, असे म्हणत राहुल गांधींवर टीका केली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी (दि.०८) एकापाठोपाठ तीन ट्विट करत जोरदार हल्ला चढवला आहेत.

केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतातील लोकांना राहुल गांधी पप्पू आहेत हे माहीत आहे. पण परदेशातील लोकांना ते पप्पू आहेत हे माहीत नाही. त्यांच्या मूर्ख विधानांवर प्रतिक्रिया देणे आवश्यक नाही. परंतु समस्या अशी आहे की, त्यांच्या भारतविरोधी विधानांचा भारतविरोधी शक्ती भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी गैरवापर करत आहेत.

राहुल गांधी हे देशाच्या एकात्मतेसाठी सर्वात मोठा धोका आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांचा उल्लेख रिजिजू यांनी अगदी पप्पू म्हणूनही केला आहे. मंत्री रिजिजू यांनी लंडनमधील एका काँग्रेस समर्थकाने राहुल यांना दिलेल्या सल्ल्याचा व्हिडिओही शेअर केला करत, राहुल गांधी आमचे ऐकणार नाहीत, पण मला आशा आहे की ते त्यांच्या या हितचिंतकांचे तरी ऐकतील, असे म्हटले आहे.

ज्यामध्ये ते इंदिरा गांधींचे उदाहरण देत, राहुल यांना समजावून सांगतात की, जगातील इतर कोणत्याही देशात भारताविरोधात बोलणे योग्य नाही. मला खात्री आहे की, तुम्ही तुमच्या आजीने इथे जे सांगितले त्यातून काहीतरी शिकाल. मी तुमचा शुभचिंतक आहे आणि मला तुम्हाला पंतप्रधान म्हणून बघायचे आहे असे त्यांच्या समर्थकाने म्हटले आहे. यावर राहुल यांनी फक्त हसत प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news