डॉ. मनोज शिंगाडे : ऋतूंनुसार डोळ्यांची काळजी वेगवेगळ्या पद्धतीने घ्यायला हवी हे आपण जाणतो, पण त्याद़ृष्टीने जाणीवपूर्वक आपण करत मात्र फारसे काही नाही ही वस्तुस्थिती आहे. वातावरणाचा शरीरावर विपरित परिणाम होत असतो. विशेषत: उन्हात फिरणार्या, उन्हात काम करणार्या व्यक्तींनी तर डोळ्यांची विशेष काळजी घ्यायला हवी.
डोळ्यांसारख्या नाजूक भागांवर नेहमीच्या उन्हाचा तर परिणाम होतच असतो; मग उन्हाळ्याच्या दिवसांची तर बातच सोडा! या दिवसांत डोळ्यांची अॅलर्जी वाढते. डोळे लाल होतात. डोळ्यांतून पाणी येते. वातावरणातील धूळ व सूक्ष्म धुलीकणांचा व तप्त वातावरणाचा डोळ्यांवर परिणाम होत असतो. या दुष्परिणामांपासून डोळ्यांचे संरक्षण करायचे असेल तर काही गोष्टी करून पाहा :