अशोक चव्हाणांचा निर्णय दुर्देवी, आणखी काही आमदार काँग्रेस सोडणार, ही अफवा’ – पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : अशोक चव्हाणांचा निर्णय दुर्देवी आहे. आणखी काही आमदार काँग्रेस सोडणार, ही अफवा आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील वरीष्ठ नेत्यांची बैठक झाली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अशोक चव्हाणांसोबत कुणी जाणार नाही. अशोक चव्हाण का नाराज होते, ही माहिती नाही.

संबंधित बातम्या –

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे धक्का बसला आहे. नेते गेले तरी मतदार पक्षासोबत आहे. अशोक चव्हाणांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. हा निर्णय घ्यायला कुणी सांगितले, हे तेच सांगतील. काँग्रेस पक्षाला तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news