कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सरकारने यावेळी बैठक वेळांत बदल केले आहेत. त्यानुसार राज्यसभेचे कामकाज सकाळच्या सत्रात तर लोकसभेचे कामकाज सायंकाळच्या सत्रात होईल. याला अपवाद अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवसाचा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात चालणार असून पहिल्या टप्प्यातले कामकाज 11 फेब्रुवारीपर्यंत चालेल. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर 8 मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यातल्या कामकाजास सुरुवात होईल. त्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अधिवेशन चालेल. वाढती महागाई, चीन सीमेवरील तणाव, कृषी क्षेत्राची दुरवस्था, कोविडमुळे मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना भरपाई, एअर इंडियाचे खाजगीकरण आदी मुद्द्यांवरून सरकारचीकोंडी करण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी केला आहे.