प्रदूषणही एक विषाणू , त्याचा मुकाबला करावा लागणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रदूषणही एक विषाणू , त्याचा मुकाबला करावा लागणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाश्वत विकास करण्यासाठी आम्ही केवळ महाराष्ट्राचा विचार करत नाही. तर संपूर्ण देशाचा विचार करतोय. कोरोनाचा अजून धोका टळलेला नाही. परंतु प्रदूषणही एक विषाणू आहे. त्याचा मुकाबला करावा लागणार आहे. पर्यावरणाचा गांभीर्याने विचार केला नाहीतर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) व्यक्त केली आहे. पर्यायी इंधन परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news