ई-चलन तत्काळ भरा, नाहीतर लायसन्स होईल रद्द

ई-चलन तत्काळ भरा, नाहीतर लायसन्स होईल रद्द
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील वाहनचालकांनो, तुमच्या गाडीवर जर कोणतेही ई-चलन शिल्लक असेल तर ते तत्काळ भरा, नाहीतर तुमचे लायसन्स रद्द किंवा निलंबित होईल. या वर्षी आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी २३२ कोटी रुपयांची ३२ लाख ५२ हजार ई- चलन जारी केले आहेत. परंतु यापैकी सुमारे ७१ टक्के ई-चलन अद्याप भरलेली नाहीत.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात. वाहनचालकांना दंडाकरिता ई- चलन जारी केले जाते. काही चालक तत्काळ ई-चलनाद्वारे आकारलेला दंड भरतात, तर काही चालक कित्येक दिवस, महिने ई-चलन भरत नाहीत. अशा चालकांना वाहतूक पोलिसांद्वारे नोटीस पाठविली जाते.

गेल्या काही वर्षांत ज्या वाहन चालकांनी ई-चलन भरले नव्हते. त्यांना वाहतूक पोलिसांनी प्री-लिटिगेशन नोटीस पाठवली होती. त्यामुळे तब्बल ४२० कोटी रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला. जे चालक वाहतुकीच्या नियमांचे तीनपेक्षा जास्त वेळा उल्लंघन करतात आणि ज्यांचे ई-चलन प्रलंबित आहे, अशा वाहनचालकांचे लायसन्स रद्द किंवा निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे पाठवला आहे.

लायसन्स जप्त केल्यानंतर ई-चलन भरण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी

लायसन्स जप्त केल्यानंतर वाहनचालकांना ई -चलनची रक्कम भरण्यासाठी १५ दिवसांचा कालवधी मिळेल. या कालावधीत त्या चालकाला तात्पुरता परवाना मिळेल. परंतु जर त्याने या कालावधीत ई-चलन भरले नाही, तर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. २०२२मध्ये ३६५ कोटी रुपयांची एकूण ५१ लाख ३४ हजार ई-चलन जारी करण्यात आली होती. त्यापैकी केवळ ३५ टक्के रक्कम चालकांनी भरली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news