शिवाय अवकाळी पाऊस, गारपिट, अतिवृष्टी, पावसातील खंड या हवामान बदलामुळे पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊन शेतकर्यांना नुकसानीस सामोरे जावे लागते. या स्थितीत शेतकर्यांना पीक विम्याचा मोठा आधार मिळत असल्याने शेतकर्यांचा कल पीक विमा उतरविण्यात वाढला असल्याची माहिती कृषी विस्तार सह संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. ते म्हणाले गत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रब्बी हंगामात 15 डिसेंबर 2022 अखेर केवळ 7 लाख 45 हजार शेतकर्यांनी ५ लाख ३४ हजार हेक्टरवरील पिकांचा विमा योजनेतून उतरविला होता.