मी सध्या राज्यसभेवर आहे. आम्हाला एक जागा मिळणे अपेक्षित होते. महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले असते तर नक्कीच मिळाली असती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमध्ये एक कॅबिनेट, विधानसभेला सात ते आठ जागा, जिल्हा नियोजन समितीवर सदस्य तसेच महामंडळामध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्यांना घेण्याचे आश्वासन दिले आहे. या सर्व अटी-शर्तीवरच त्यांना पाठिंबा दिला असून बिनशर्त पाठिंबा दिलेला नसल्याचा केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.