![Nissan-Renault ची भारतात ५३०० कोटींची गुंतवणूक; दोन हजार नोकऱ्यांची निर्मिती](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F02%2FNissan-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
चेन्नई; पुढारी ऑनलाईन : कार निर्माता कंपनी रेनॉल्ट आणि निसानने (Nissan-Renault) संयुक्तपणे भारतात आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी देशात ६० कोटी डॉलर्स अर्थात ५३०० कोटींच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या दोन्ही कार निर्मात्या कंपन्या लवकरच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी दोन नवीन पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांसह (EV) सहा नवीन वाहने सादर करतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गुंतवणुकीच्या रकमेचा वापर चेन्नईतील रेनॉल्ट-निसान कारखाना आंतरराष्ट्रीय निर्यात केंद्रात अपग्रेड करण्यासाठी देखील केला जाईल.
रेनॉल्ट आणि निसान प्रत्येकी तीन वाहने सादर करतील (Nissan-Renault)
Renault आणि Nissan प्रत्येकी तीन नवीन वाहने बाजारात आणतील, जी चेन्नईतील कॉमन अलायन्स प्लॅटफॉर्मवर तयार केली जातील आणि संबंधित ब्रँडची वैयक्तिक व विशिष्ट शैली कायम ठेवतील. यामध्ये चार नवीन सी-सेगमेंट एसयूव्हीचा समावेश असेल. दोन नवीन A-सेगमेंट कार भारतातील Renault आणि Nissan या दोन्ही ब्रँड्सच्या पहिल्या ईव्ही असतील.
एसयूव्ही आणि ईव्ही वाहनांची होणार निर्मिती
स्थानिक बाजारपेठेसाठी उच्च दर्जाच्या एसयूव्ही आणि ईव्हीच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण आहे. निसान मोटर कंपनीचे प्रतिनिधी कार्यकारी अधिकारी आणि सीओओ अश्वनी गुप्ता म्हणाले की निसानची ताकद एसयूव्हीमध्ये आहे आणि कंपनीच्या जागतिक विक्रीपैकी ७० टक्क्यांहून अधिक विक्री याच विभागातून होते. मॅग्नाइट हे भारतातील एक उत्कृष्ट उदाहरण आहे. गुप्ता म्हणाले की, आम्ही आमच्या बाजारपेठेची व्याप्ती दुप्पट करू. निर्यात बाजारांवर नजर ठेवून, दोन्ही कंपन्यांचे संयुक्तीकरण मॅग्नाइट आणखी विकसित करेल. (Nissan-Renault)
EV वाहने २०२५ पर्यंत लाँच होणार आहेत
गुप्ता यांनी माध्यमांना सांगितले की नवीन टप्प्यात २०२५ पासून उच्च क्षमतेचा वापर आणि EV सुरू होतील. सध्या, आमचा नवीन प्लांट उभारण्याची कोणतीही योजना नाही, कारण आमचा एक उत्कृष्ट कारखाना आहे. ते म्हणाले की या साइटला निश्चितपणे आधुनिकीकरणाची गरज आहे, कारण आम्ही उत्पादनांचे विद्युतीकरण करणार आहोत.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी
सोमवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नवीन दीर्घकालीन धोरणामध्ये, उच्च उत्पादन आणि संशोधन व विकासावर लक्ष्य केंद्रीत कले जाईल. या प्रकल्पातून नव्या 2,000 नोकऱ्या निर्माण होतील.
अधिक वाचा :