![NCP Crisis News: महाभारताचा संदर्भ देत खा. अमोल कोल्हेंनी केला व्हिडिओ शेअर : म्हणाले, “राष्ट्रवादीत मिठाचा खडा…”](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F06%2Fpic.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील काही आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाभारताची आठवण होतेय. सध्याच्या घडामोडींवर आधारित महाभारताचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादीत मिठाचा खडा टाकणारा शकुनीमामा कोण? असा सवाल देखील (NCP Crisis News) केला आहे.
अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये म्हटलंआहे की, जेव्हा लोक महाभारताचा विचार करतात, तेव्हा कौरव अन् पांडव समोर येतात; पण हे महाभारत नेमके कोणामुळे घडले, तर ते शकुनीमामामुळे घडले. राष्ट्रवादीत देखील महाभारतासारखीच स्थिती निर्माण झाली आहे. तर राष्ट्रवादीत मिठाचा खडा टाकणारा शकुनीमामा कोण? (NCP Crisis News) असे कोल्हे यांनी म्हटलं आहे.
जेव्हा कौरव आणि पांडव एकत्र होते तेव्हा 'वयम् पंचाधिकम् शतम्' अशी भावना होती. म्हणजे जेव्हा समोरून काही आक्रमण आले तेव्हा कौरव-पांडव हे भाऊ एकत्र येऊन मुकाबला करत होते; पण यात कोणी मिठाचा खडा टाकला? तर तो शकुनी मामाने टाकला? तर मग राष्ट्रवादीत मिठाचा खडा टाकणारा शकुनीमामा कोण? असा सवाल या व्हिडिओच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही, असा इशाराही कोल्हे यांनी ट्विटच्या (NCP Crisis News) माध्यमातून दिला आहे.