Nana Patole : हे तर भाजपचे पाप लपविण्यासाठी पश्चात्ताप आंदोलन : नाना पटोले

Nana Patole : हे तर भाजपचे पाप लपविण्यासाठी पश्चात्ताप आंदोलन : नाना पटोले
नागपूर पुढारी वृत्तसेवा : कंत्राटी भरती केल्यास सगळी तरुणाई आपल्या विरोधात जाईल म्हणूनच हे आपले पाप लपविण्यासाठी केलेले आजचे आंदोलन म्हणजे एक प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनीच जनतेची माफी मागावी. देवाच्या नावाने पैश्याची लूट करणे ही भाजपची भूमिका लपुन राहिलेली नाही. गंगा नदीच्या पाण्यावर 18 तक्के GST यांनी लावली. त्यामुळे भाजपचे देवाच्या नावाने पैसै कमावणे हेच काम आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. (Nana Patole)

नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन दोन महिने चाललेच पहिजे

हिवाळी अधिवेशन संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस आता दुसरे मुख्यमंत्री आहेत. ते विदर्भातले अन विशेष म्हणजे नागपूरचे आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, नागपूर कराराप्रमाणे हे अधिवेशन दोन महिने चाललेच पहिजे. आजवर सगळ्या शेतकऱ्यांना उध्वस्त करायचे काम भाजपने केले आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ असताना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक शब्दही काढला गेला नाही असा आरोप पटोले यांनी केला. काँगेसने ही भूमिका सुरुवातीला मांडली होती. सामान्य माणसांनी आमचे मूल बरबाद होत आहे, अशी व्यथा मांडली तेव्हां सरकारला जाग आली. आजही सरकारला आम्ही वेळ देतोय. महाराष्ट्रतील तरुणाई संपवायला निघालेल्यांमध्ये ज्यांचे कोणाचे लागेबांधे असतील त्यांना समोर आणावे. प्रसंगी सरकारला काँग्रेसची मदत लागल्यास आम्ही मदत करु. असं नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole :  टोला एकनाथ शिंदे व अजित पवारांना होता का?

नाना पटोले बोलताना म्हणाले की,"ललित पाटलांनी स्वतः सांगितलं, मला राज्यकर्त्यांनी पळवून लावलं. तो मैत्रिणी सोबत एन्जॉय करतोय, अश्या माणसाला कोणत्या आधारावर सगळी सुविधा पुरविण्यात येते? रोगी नसताना उपचारासाठी भरती कसं करण्यात आल. या सगळ्यात जो-जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी.  यांच्या पायाखालची माती खचल्याने ते चिडलेले लोक आहेत. कालची फडणवीसांची खेळी समजून घेण्यासारखी आहे. ही खेळी त्यावेळी सत्तेत असणाऱ्या आजित पवार, एकनाथ शिंदेंसोबत खेळली गेली आहे. खरेतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या वेळी हे सत्तेत होते. त्यामुळे कालचा टोला एकनाथ शिंदे व अजित पवारांना होता का? असा प्रश्न निर्माण होतोय."

Nana Patole : आता जाग आली का?

आता दीड वर्ष तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हाला आता जाग आली का?  नागपूरला अधिवेशन होईपर्यंत काय काय खेळ होतात ते बघायचं असा इशाराही दिला. राज्य मंत्रिमंडळात सगळे सामुहिक निर्णय असतात. पण तहसीलदारापर्यंत पदे भरावी असे कुठेही नाही. आऊटसोर्स या सरकारने आणलेय, त्यामुळे शासनाची साईट खुलीआहे ज्यांना शंका आहे त्यांनी ती तपासावी,तरुणांना भजे, पकोडे तळणारे जर हे समजत असतील तर तो त्यांचा गैरसमज आहे. आरक्षण प्रकरणी ज्या भाजपने आग लावली, त्यांनेच हा निर्णय द्यावा,सत्तेसाठी धनगर समाज, गोवारी, मराठा समाजाला सांगितल की 24 तासांत आम्ही आरक्षण देणारं आता त्यांनीच द्यावे यावर नाना पटोले यांनी भर दिला.
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news