आता दीड वर्ष तुम्ही सत्तेत आहात तर तुम्हाला आता जाग आली का? नागपूरला अधिवेशन होईपर्यंत काय काय खेळ होतात ते बघायचं असा इशाराही दिला. राज्य मंत्रिमंडळात सगळे सामुहिक निर्णय असतात. पण तहसीलदारापर्यंत पदे भरावी असे कुठेही नाही. आऊटसोर्स या सरकारने आणलेय, त्यामुळे शासनाची साईट खुलीआहे ज्यांना शंका आहे त्यांनी ती तपासावी,तरुणांना भजे, पकोडे तळणारे जर हे समजत असतील तर तो त्यांचा गैरसमज आहे. आरक्षण प्रकरणी ज्या भाजपने आग लावली, त्यांनेच हा निर्णय द्यावा,सत्तेसाठी धनगर समाज, गोवारी, मराठा समाजाला सांगितल की 24 तासांत आम्ही आरक्षण देणारं आता त्यांनीच द्यावे यावर नाना पटोले यांनी भर दिला.