याचिका दाखल केलेल्या पक्षांमध्ये काँग्रेस, आप, राजद, तृणमूल, शिवसेना (युबीटी), द्रमुक, संयुक्त जनता दल, भारत राष्ट्र समिती, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आदी पक्षांचा समावेश आहे. विरोधी नेत्यांना तपास संस्थांकडून जाणूनबुजून अटक केली जात आहे. त्यामुळे अटकपूर्व आणि अटकेत्तर मार्गदर्शक तत्वे आखून दिली जावीत, असे विरोधी पक्षांनी याचिकेत म्हटले आहे. 'मोदी' नावावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीवर गुजरातच्या सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली (Misuse of ED and CBI) होती. याच्या दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, हे विशेष आहे.