Mann ki baat 104 : ‘आसमान में सिर उठाकर…’ चांद्रयान 3 च्या यशावर PM मोदींनी वाचली त्यांची कविता…

Mann ki Baat
Mann ki Baat

पुढारी ऑनलाइन डेस्क : Mann ki baat 104 : आसमान में सिर उठाकर, घने बादलों को चीरकर…..मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान 3 च्या यशावर त्यांनी लिहिलेली कविता वाचली. तसेच चांद्रयान मोहीम ही नवीन भारताच्या स्पिरिटचे प्रतिक आहे, असे म्हटले आहे. याशिवाय नारी शक्ती, जी 20, चीनच्या वर्ल्ड यूनिवर्सिटी गेम्समध्ये भारतीय खेळाडूंच्या परफार्मन्सबद्दल त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख याही भागात केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतात. आजचा मन की बातचा 104 वा भाग होता. जाणून घेऊ मोदी आणखी काय म्हणाले….

चांद्रयानचे यश मोठे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याची सर्वत्र चर्चा होत आहे. चांद्रयानाच्या यशाने यशाचे काही सूर्य चंद्रावरही उगवल्याचे दाखवून दिले आहे. चांद्रयान हे नवीन भारताच्या आत्म्याचे प्रतीक बनले आहे, ज्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे आहे आणि कोणत्याही परिस्थितीत कसे जिंकायचे हे देखील माहित आहे.

Mann ki baat 104 : 'चांद्रयान हे स्त्री शक्तीचे जिवंत उदाहरण'

हे अभियान स्त्रीशक्तीचे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण मोहिमेत अनेक महिला शास्त्रज्ञ आणि अभियंते यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. पीएम मोदी म्हणाले, भारताच्या मुली आता अनंत समजल्या जाणाऱ्या अवकाशालाही आव्हान देत आहेत. जेव्हा एखाद्या देशाच्या मुली एवढ्या महत्त्वाकांक्षी बनतात, तेव्हा त्या देशाला विकसित होण्यापासून कोण रोखणार?

Mann ki baat 104 : भारत जी-20 साठी तयार

सप्टेंबर महिन्यात G-20 च्या लीडर्सचे समिट होणार आहे. या समिटसाठी भारत पूर्णपणे तयार आहे. G-20 परिषदेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग असेल. PM मोदी म्हणाले की भारताने G 20 ला अधिक समावेशक मंच बनवले आहे. रताच्या निमंत्रणावरूनच आफ्रिकन संघ G-20 मध्ये सामील झाला आणि आफ्रिकेतील लोकांचा आवाज जगाच्या या महत्त्वाच्या व्यासपीठावर पोहोचला. सप्टेंबर महिना भारताच्या क्षमतेचा साक्षीदार असणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Mann ki baat 104 : वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक

चीनमध्ये आयोजित वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 26 पदके जिंकली यात 11 सुवर्णपदके होती. हे यश किती मोठे आहे हे सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले की तुम्हाला हे जाणून आनंद होईल की 1959 पासून झालेल्या जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये जिंकलेली सर्व पदके जरी जोडली गेली तरी ही संख्या केवळ 18 वर पोहोचते. या एकूण संख्येपेक्षा यावेळची संख्या 8 ने जास्त आहे.

यासोबत त्यांनी अनेक खेळाडूंशी प्रत्यक्ष संवाद साधला. या संवादात त्यांच्याकडून इतर खेळाडूंना प्रेरणा मिळेल, अशा प्रकरचा संवाद साधला. त्यांनी खेळासाठी घेतलेले कष्ट, मेहनत आणि त्यांचा एकूण प्रवास जाणून घेतला.

Mann ki baat 104 : सेल्फी विथ तिरंगा; मेरी माटी मेरा देश

यावेळी त्यांनी सेल्फी विथ तिरंगा, मेरी माटी मेरा देश यांसारख्या अभियानाच्या यशाविषयी माहिती दिली. त्याव्यतिरिक्त संस्कृत भाषेतील वाढती रुचीबद्दल माहिती देत. तसेच विश्व संस्कृत दिवसाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत. याशिवाय तेलुगु भाषा आणि तेलुगु दिवसाची देखील शुभेच्छा मोदी यांनी दिली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news