इम्फाळ (वृत्तसंस्था) : इम्फाळमधील चुरचंदपूर शहराचा संपर्क संपूर्ण देशापासून तुटलेला आहे. कुकी बंडखोरांनी शहराकडे जाणारे सर्व रस्ते अडवले आहेत. (Manipur Violence)
कुकी बंडखोरांनी त्यासाठी उंच ठिकाणांवर बांधलेले काही बंकर लष्करी जवानांनी उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. मणिपूरमधून अनेक विस्थापित मेघालयात पोहोचत आहेत. मुख्यमंत्री के. संगमा यांनी अशा प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत. (Manipur Violence)
सर्वपक्षीय बैठक उद्या
मणिपूरमधील परिस्थितीवर गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. काँग्रेसने या बैठकीच्या स्थळावर व पंतप्रधानांच्या अनुपस्थितीवर आक्षेप घेतला आहे.
अधिक वाचा :