श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने दुपारी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक आहे. त्याला आमचा विरोध नाही. मात्र, आम्हाला त्यांच्यासोबत चार वाजता निघणे शक्य होणार नाही. पोलिसांनी आम्हाला रस्ता रिकामा करून द्यावा आणि जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा. बेलबाग चौक ते लक्ष्मी रस्त्यापर्यंत पोलिसांनी आम्हाला मार्ग उपलब्ध करून द्यावा. त्यानंतर सिटी पोस्ट चौक ते टिळक चौकात मंडळांची मिरवणूक जायला अडीच ते तीन तास लागतील. त्यामुळेच आम्ही लगेच पुढे जाऊ आणि मिरवणूक लवकर संपेल.– अण्णा थोरात, अध्यक्ष, अखिल मंडई मंडळ
हेही वाचा