file photo
file photo

चंद्रपूरसह विदर्भातील सर्वच जागांवर महायुती जिंकेल : चित्रा वाघ

Published on

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा केवळ चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रच नाही, तर पहिल्या टप्प्यातील विदर्भाच्या सर्वच्या सर्व जागी महायुती जिंकेल असा दावा भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे केला. चंद्रपूर येथील पत्रकारांशी त्‍यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी असा दावा केला.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत आहे. बाईचे मत बाईला अशी विनवणी काँग्रेसच्या उमेदवार करीत असल्या तरी लोकांना आता विकास हवा आहे. मी अवघ्या मतदार संघात फिरले, सभा केल्या, महिलांना भेटले. तेव्हा बाईचे मत बाईला नाही, तर ते विकासाला आहे, हे सिध्द झाले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात प्रचंड विकासकामे केली आहेत. असाच विकास वणी व आर्णी येथील मतदारांनाही हवा आहे. विकास कामांवर महिलावर्ग खुश असल्याचे त्यांनी सांगितले.

सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचार सभेत जे वक्तव्य केले ते काही त्यांचे मनाचे श्लोक नव्हते. तर तो काँग्रेसचा नोंदवलेला गंभीर इतिहास आहे. जनतेवर जो अन्याय, अत्याचार त्या काळी आणीबाणी प्रसंगी झाला तो खरा आहे. नसेल तर काँग्रेसने त्याचे खंडन करावे. केवळ त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करू नये. त्याने कुठलाच लाभ होणार नाही.

महिलांसाठी मोदी सरकारने खुप मोठी कामे केली आहेत. महिला वर्गाला त्याची जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्यात मोठा उत्साह मला पाहता येत आहे. वणी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील महिलांशी मी संवाद साधला, तेथेही मोदी यांचा फोटो आणि कमळ चिन्ह ते ओळखतात हीच आमची मोठी उपलब्धी आहे, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news