महाराष्ट्र असो, की देशातील सरकार असो, एखाद्या विकास कामाच्या किमती वाढल्या तर आक्षेपावर कॅग किंवा महाराष्ट्र ऑडिट डिपार्टमेंट असो त्याचे रिमार्क येतात. मग कंपलायन्स करावं लागतं. त्यात खर्च का वाढला, असे उत्तर दिले की ते डिलीट केले जातात. नितीन गडकरी यांना कुणीही अडचणीत आणू शकत नाही. केवळ संभ्रम तयार करण्यासाठी विरोधीपक्ष नेते बोलत आहेत. त्याचा अर्थ भ्रष्टाचार झाला असा होत नाही. गडकरी हे नेते आहेत. काँग्रेसमध्ये दहा तोंडाचे दहा लोक आहेत. भाजपमध्ये तसं नाही. आमचा पक्ष मजबूत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते आता नव्याने जे तोंडात येईल ते बोलत आहेत अशी टीका केली. २८८ मतदार संघ दौरासंदर्भात छेडले असता बावनकुळे म्हणाले, आम्ही तिन्ही पक्ष एकमेकांना ताकद देण्याचे काम करणार आहोत. आपला पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात क्रमांक एक वर आणण्यासाठी प्रचंड ताकदीने आमचे काम सुरू झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.