नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षात १६ आमदार अपात्रतेचा महत्वाच्या मुद्यावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने विधानसभा अध्यक्षांवर सोडला आहे. सत्तासंघर्षावरील निकालानंतर पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर आज (दि.२४) दिल्ली दौऱ्यावर पोहचल्याने अनेक राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहे. तूर्त कुठल्याही राजकीय भेटीगाठी घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा निर्णय घेण्यापूर्वी ते काही कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञांची भेटी घेणार असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले आहे का? असा सवाल विचारला असता या संबंधी विधीमंडळ सचिवालाकडे माहिती मिळेल. अद्याप यासंदर्भात माझ्याकडे माहिती नसल्याचे नार्वेकर म्हणाले. मतदार संघातील काही कामे होती.या अनुषंगाने दिल्ली दौऱ्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भेट घेतली का? असा प्रश्न विचारले असतांना अनेक लोकांना भेटत असतो. अद्याप राजकीय दृष्टिकोनातून भेट झालेली नाही. अनेकदा दिल्लीत येत असतो. पंरतु, सत्तासंघर्षाच्या निकालानंतर पहिल्यांदाच दिल्लीत आलो असल्याचे नार्वेकर म्हणाले.
हेही वाचा :