![Lok Sabha Election 2024 | उद्धव ठाकरेंची ‘ती’ चूक अक्षम्यच; मंत्री महाजन यांची टीका](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F06%2F%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस आघाडीसोबत जाण्याची केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल, असे टीकास्त्र मंत्री गिरीश महाजन यांनी सोडले. आपल्या राजकीय जीवनात ठाकरे यांनी केलेली चूक अक्षम्य असल्याचे असल्याचे मतही त्यांनी नोंदवले.
गुढीपाडवा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती असताना केवळ खुर्चीसाठी त्यांनी काँग्रेस आघाडीच्या मांडीवर जाणे पसंत केले. ठाकरे यांनी आपल्या आयुष्यात केलेली ती महत्तम चूक असून, त्यांना अखेरपर्यंत ती भोवणार असल्याचे ते म्हणाले. 'त्यांची' हॉटलाइन थेट दिल्लीत… दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीबाबत विचारले असता, महाजन यांनी कानावर हात ठेवले. खडसे यांची हॉटलाइन भेट दिल्लीत असल्याने आपण त्यावाचत अनभित्रा असल्याची खोचक टीका महाजन यांनी केली, लोकसभेच्या जळगाव आणि रावेर मतदारसंघांत भाजप मोठी मुसंडी मारणार असून, दोन्ही ठिकाणी आम्ही विक्रमी विजयाची नोंद करू, असा विद्यास एका प्रश्नाच्या उत्तरात महाजन यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: