![lightning](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F10%2Flightning-strike.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन: पश्चिम बंगालमध्ये गुरूवारी (दि.२७) वीजांच्या कडकडाटांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर काही जिल्ह्यात वीज देखील पडली आहे. दरम्यान येथील पाच जिल्हयात वीज कोसळल्याने यामध्ये जवळपास १४ जणांचा मृत्यू (Lightning In West Bengal) झाला, अशी माहिती येथील अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे.
आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात चार आणि मुर्शिदाबाद आणि उत्तर 24 परगणा येथे प्रत्येकी दोन अशा एकूण आठ जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. येथील पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम मिदनापूर आणि हावडा ग्रामीण जिल्ह्यात प्रत्येकी तीन अशा एकू सहा जणांचा वीज कोसळून मृत्यू (Lightning In West Bengal) झाल्याचे सांगण्यात आले आहे.
अंगावर वीज पडून मृत्यू झालेल्यांमध्ये बहुतेकजण (Lightning In West Bengal) शेतकरी होते. शेतात काम करत असताना अचानक झालेला पाऊस आणि वीजेमुळे १४ जणांचा मृत्यू झाल्याचे येथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.