![वेदना संपत नाही..! केएल राहुलचे भावनिक ट्विट](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F11%2FF_mYTPHbwAAMX0h.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेत सलग दहा विजयांची नोंद करत अंतिम फेरीत धडक मारलेली टीम इंडिया विश्वचषक जिंकणारच, असा विश्वास खेळाडूंसह देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना होता. मात्र रविवार, १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या पराभवाचा खोलवर परिणाम टीम इंडियातील खेळाडूंवर झाला आहे. आता संघातील स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक केएल राहुल याने विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवावर चार दिवसांनी एक ट्विट करत आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे. (KL Rahul's Emotional Tweet)
still hurts… असे केवळ एका वाक्याचे ट्विट करत केएल राहुलने पराभवानंतर चार दिवसांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ग्लेन मॅक्सवेल आणि झाम्पाने प्रत्येकी एक विकेट घेतली. (KL Rahul's Emotional Tweet)
पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मासह भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर
टीम इंडियाने दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा पाढलाग करताना भारताने सुरूवातीलाच ऑस्ट्रेलियाला ३ धक्के दिले. मात्र, चौथ्या विकेटसाठी ट्रायव्हस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी मोठी भागीदारी रचली आणि भारताला सामन्यातून बाहेर केले. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३ तर मोहम्मद शमीने १ विकेट पटकावली. (World Cup 2023 Final) या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह भारतीय खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते. त्याचबरोबर कोटयवधी भारतीय क्रिकट चाहतेही निराश झाले.
हेही वाचा :