पुढारी ऑनलाईन डेस्क : मला फक्त सरकारची चूक दाखवून द्यायची आहे. दोन गटांमध्ये दंगली घडविण्याचे काम हे सरकार करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर केला. माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी मुंबईत आज (दि. २२) ही प्रतिक्रिया दिली.
खारघर दुर्घटनेमध्ये उष्माघातामुळे लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सरकार येवढे निष्काळजी का असा सवाल त्यांनी केला. हिंदूत्व सांगणारे हे सरकार का दुर्लक्ष करत आहे. जे मेले ते हिंदू नव्हते का? हिंदू-मुस्लिम एवढाच विषय घेऊन हे सरकार बोलते; मग आता का हे सरकार गप्प आहे, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
माझ्या इथे दोन दोन लाख लोक असायचे. मी समाजाला जोडणारा माणूस आहे. अनेक दंगली मी बघितल्या आणि शमविल्या देखील आहे. दिपावली, पाडव्यानिमित्त शोभायात्रा निघतात मग त्यावेळी दंगली का होत नाहीत. सरकारच्या चुका दाखवून देणं यासाठीच बोलत आहे असं म्हणत आव्हाड यांनी सत्ताधारी गटाला धारेवर धरले.
माध्यमांशी बा आव्हाड यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रामनवमी आणि हनुमान जयंती हे सण देशात दंगली भडकवण्यासाठीच असतात असे दिसते. दंगलीमुळे शहरांतील वातावरण अत्यंत विषारी झाले आहे. तसेच ते असंही म्हणाले की, येणारे वर्ष हे धार्मिक दंगलीचे वर्ष असेल. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचे नाव अनेकदा वादात आले आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्र मानव आयोगानेही त्यांच्याविरोधात नोटीस बजावली आहे.
हेही वाचा