नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सुदानमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामध्ये एका भारतीय नागरिकाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. मूळच्या केरळमधील कन्नूरचा रहिवासी असलेला अल्बर्ट ऑगस्टीन हा दाल ग्रुप ऑफ कंपनीमध्ये काम करीत होता.
सुदानमध्ये हिंसाचार सुरु असताना अल्बर्ट ऑगस्टीनला गोळी लागली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अल्बर्ट याला श्रद्धांजली वाहिली असून, सुदानमध्ये वावरताना भारतीय नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे..
सुदानी लष्कर आणि तेथील आरएसएफ नावाच्या निमलष्करी समूहादरम्यान सध्या उग्र हिंसाचार सुरु आहे. यात असंख्य लोकांचा बळी पडलेला आहे. दरम्यान हिंसाचारात बळी गेलेल्या अल्बर्टच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :