मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी पुरेसा अवधी दिलेला नाही. भाजपला सरकार पाडण्याची घाई झाली आहे, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल देतात, हे बेकायदेशीर आहे. याविरोधात महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. एका दिवसात चंद्रपूर किंवा राज्यातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या आमदारांना मुंबईत येणे अशक्य आहे. शिंदे गटाच्या २६ आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतची याचिका सर्वोच्य न्यायालयात दाखल झालेली आहे. त्या पूर्वीच भाजपला सरकार पाडण्याची घाई झाली आहे, असा आरोप थोरात यांनी केला.
हेही वाचा :