राज्यातील पोलिसांनाच संरक्षण देण्याची वेळ; पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने जरब बसवावी : अजित पवार

अजित पवार
अजित पवार
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले पोलिसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. या हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने जरब बसविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

पवार म्हणाले की, राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. अंगावर थेट गाडी चढवणे, गाडीसोबत फरफटत नेणे, लोकांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाणे, अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे. एकंदरीतच राज्यात पोलिसांवर वेगवेगळया ठिकाणी हल्ला होण्याच्या घटना वाढत असून नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलिसांनाही संरक्षण, संपर्कासाठी वॉकी टॉकी, मोटारसायकल, इत्यादी गोष्टी पुरविण्याची आवश्यकता आहे. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती वाढू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. दोषींवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी आणि पोलीसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी तसेच असे हल्ले होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी पवार यांनी केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news