परंतु पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी एखाद्या सिंचन प्रकल्पाची देखील निकडीची आवश्यकता नांदगाव तालुक्याला भासत आहे. शेतीसाठी पाणी हा महत्वाचा प्रश्न आहे. नांदगाव तालुक्यात दहेगांव धरण, माणिकपुंज धरण, नागासाग्या धरण, गिरणा धरण अशी छोटी मोठी धरणे आहेत. यामध्ये दहेगाव धरण नांदगाव शहरासाठी राखीव आहे. परंतु दहेगाव धरण हे नियमीतपणे भरत नसल्याने माणिकपुंज धरणातून देखील नांदगाव शहरासाठी पिण्याचे पाणी आरक्षित आहे. तसेच माणिकपुंज, कासारी, जळगाव बु., जळगाव खु., पोही, कसाबखेडा, चांदोरा, न्यायडोंगरीसह चाळीसगाव तालुक्यातील गावांना येथील धरणाचा सिंचनासाठी उपयोग होत असतो. नाग्या-साक्या आणि गिरणा धरणाचा तालुक्यातील काही ठराविक गावांनाच सिंचनासाठी उपयोग होतो आहे.