डोंबिवली: भिंत कोसळून २ कामगारांचा मृत्यू : ३ जण जखमी
डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना बाजूला असणारी जुनी भिंत अंगावर कोसळून २ कामगारांचा मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. डोंबिवली पश्चिम सिद्धार्थनगर परिसरात आज (दि.२१) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत मल्लेश चव्हाण ( वय ३५), आणि बंडू कोवासे (वय ५०) या कामगारांचा मृत्यू झाला. तर माणिक ओवर (वय ६२), विनायक चौधरी (वय ३५), युवराज वेडगुत्तलवार (वय ३५) अशी जखमींची नावे आहेत.
सिद्धार्थ नगर गोंधळी समाज जोशी मित्रमंडळ वस्तीतील तरुण किशोर भिसे, दत्ता म्हात्रे, श्रावण माने, लेखन पैठणे, रोहित इंगळे, सतीश जोशी हे देवीचे मंडप बांधण्याच्या तयारीत व्यस्त होते. यावेळी अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने हे सर्वजण पुढे धावून गेले. यावेळी या सर्व तरुणांनी धावपळ करत या सर्व कामगारांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात दिला.
हेही वाचलंत का ?