नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना काँग्रेसने पुन्हा एकदा काही प्रश्न विचारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान आज महाराष्ट्रातील नंदुरबार दौऱ्यावर होते. या पार्श्वभूमीवर आदिवासी समुदायांना जमिनीचा हक्क, शेतकरी आत्महत्या आणि वाढती बेरोजगारी याविषयीचे प्रश्न विचारून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला.