पुढारी ऑनलाईन डेस्क : कोविड -१९ च्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना दिसून येत आहे. मात्र एवढे असूनही भारतात दुसऱ्या बुस्टर डोस देण्याची आवश्यकता नाही. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार सध्या कोरोनाबाबतची माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १३४ नवीन प्रकरणांची नोंद करून भारतातील सक्रिय संख्या सध्या २५८२ वर पोहोचली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण २२०.११ कोटी लसीचे डोस (९५.१३ कोटी दुसरा डोस आणि २२.४१ कोटी खबरदारी डोस) देण्यात आले आहेत. ही सर्व माहिती पाहता भारताला हा दुसरा बुस्टर डोसची आवश्यकता नसल्याचे सरकारी हवाल्यामध्ये म्हटले आहे.
हेही वाचा