पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बागमती नदीत आज ( दि. १४) सकाळी ३० मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली. आतापर्यंत २० मुलांना वाचविण्यात यश आले असून, अन्य १० बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.
बागमती नदीत आज ( दि. १४) सकाळी ३० मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली.या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली. ततत्काळ शोध मोहीम हाती घेण्यात आली.घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले. आतापर्यंत २० मुलांना वाचविण्यात यश आले असून, अन्य १० बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे.
हेही वाचा :