![Maharashtra politics](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F11%2F%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे कोल्हे पवार गटात जाणार का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, आपल्या लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसदर्भात ही भेट होती, असा दावा कोल्हे यांनी केला आहे. ( Maharashtra politics )
संबंधित बातम्या
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. तसेच शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करा, असे पत्र अजित पवार गटाने नुकतेच लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी अजित पवारांच्या घेतलेल्या भेटीने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, आपली ही भेट राजकीय नव्हती, असा दावा कोल्हे यांनी केला. खासदार झाल्यापासून वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधिस्थळाच्या स्मारक विकासासाठी जो पाठपुरावा सुरू होता, त्याला अजित पवार यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांचे आपण आभारही मानल्याचे त्यांनी सांगितले. ( Maharashtra politics )