पनवेल पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यास उपस्थितापैकी ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबद्दल राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केली आहे. म्हणाले आहेत की, "हा प्रसंग टाळता आला असतं बरं झालं असतं. सकाळी या गोष्टी करायची काही आवश्यकता नव्हती. सध्या सगळंच वातावरण उन्हाने तापलं आहे. अशा वेळी इतक्या लोकांना बोलवायचं, आप्पासाहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. हा पुरस्कार राजभवनावर बोलून देखील देता आला असता. इतक्या लोकांना बोलावून ही गोष्ट करायची आवश्यकता नव्हती".
राज ठाकरे म्हणाले की, "झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. याला कोणालाही जबाबदार धरता येणार नाही. मात्र हा कार्यक्रम सकाळी न करता संध्याकाळी केला असता, तर हा प्रसंग टाळता आला असता".
ते म्हणाले की, "ही कोणी ठरवून केलेली गोष्ट नाही. इतकी लोकं येणार तर हा कार्यक्रम संध्याकाळी नाही तर सकाळीच ठेवता येणार. इतक्या लोकांना बोलावण्यापेक्षा राजभवनात बोलावून इतर लोकांना जसं पुरस्कार देतात. तसं दिल गेलं असं तर हा प्रसंग उभा राहिला नसता."
हेही वाचा