...आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री : जयंत पाटील

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाले आहेत. यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या तरतुदीमध्ये सध्याच्या सरकारने मोठी कपात केली आहे. याचा फटका मागासवर्गीयांच्या अनेक योजनांना बसला आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेची मूळ अर्थसंकल्पातील तरतूद १२०० कोटींवरून ८४० कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या तरतुदीमध्येही कपात, ‘स्टँड अप इंडिया’ योजनेची मूळ अर्थसंकल्पातील असलेली १०० कोटी रुपयांची तरतूद कमी करून १० कोटी करण्यात आली याबाबींकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
हेही वाचा :
- दंगल घडवणाऱ्यांना कुणीही खतपाणी घालू नये, शांतता ठेवण्याचे अजित पवार यांचे आवाहन
- रत्नागिरी : पोलिस शिपाई भरती; पात्र उमेदवारांची २ एप्रिल रोजी लेखी परीक्षा
- Donald Trump Money Hash Case: पॉर्न स्टारशी संबंधित प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई होणार