अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शासनाने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल 350 रुपयांप्रमाणे अनुदान जाहीर केले. मात्र, शासन आणि सहकार विभागात 'कागद पे कागद' सुरुच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र 55 हजार शेतकर्यांचे 33,37,817 क्विंटल कांद्याचे 116 कोटी रुपये अजुनही मिळालेले नाहीत. दरम्यान, हे अनुदान लवकरच वर्ग होणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगितले जाते. मध्यंतरी कांद्याचे भाव गडगडल्याने शासनाने शेतकर्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनात शेतकर्यांचे प्रस्ताव बोलाविण्यात आले.
जिल्ह्यातून 78752 शेतकर्यांनी कागदांची जुळवाजुळव करून आपले प्रस्ताव सादर केले. मात्र यात छाननी झाली आणि 23 हजार शेतकरी अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे या शेतकर्यांचा भ्रमनिराश उवर्रीत 55368 शेतकरी अनुदानास पात्र असल्याचा अहवाल पुढे पाठविण्यात आला. संबंधित पात्र शेतकर्यांनी 33 लाख 37 हजार क्विंटल विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 350 रुपये प्रमाणे 116 कोटी 82 लाख 36 हजार रुपयांचे अनुदान यादी तयार करण्यात आली. तशी मागणी शासनाकडे पाठविण्यात आली. मात्र अजुनही ही रक्कम शेतकर्यांना मिळालेली नाही. काही जिल्ह्यांत दोन टप्प्यात हे अनुदान दिले जात आहे. तर नगर जिल्ह्यात अजुन एकही टप्पा आलेला नाही. दरम्यान, शासनाच्या निर्देशनानुसार नुकतीच जिल्हा सहकार विभागाकडून कांदा अनुदान लाभार्थ्यांची सुधारीत मागणी आकडेवारी पाठविली आहे. त्यामुळे आतातरी हे अनुदान प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे.
तालुका शेतकरी अनुदान
नगर 21768 50,65,42,817
अकोले 366 57,20,491
संगमनेर 5818 13,17,17,668
कोपरगाव 5141 88,91,100
राहाता 1225 2,03,45,447
श्रीरामपूर 1142 2,61,83,517
राहुरी 4063 5,20,47,677
नेवासा 3161 6,34,28,634
शेवगाव 668 80,64,441
पाथर्डी 211 20,43,968
जामखेड 1839 3,79,44,585
कर्जत 811 1,71,24,775
श्रीगोंदा 1130 3,72,55,862
पारनेर 5478 11,73,74,820
साईराज 178 2,86,90,674
संवत्सर 484 71,57,566
गोदावरी 23 1,80,460
ओमचैतन्य 1538 3,65,94,848
प्रसन्ना 206 56,57,505
नाफेड 38 10,49,300
एकूण 55368 116,82,36,065
हेही वाचा