सुदानमध्ये अडकलेल्या सांगलीकरांसाठी जयंत पाटील सरसावले

सुदानमध्ये अडकलेल्या सांगलीकरांसाठी जयंत पाटील सरसावले
Published on
Updated on

मुंबई पुढारी वृत्तसेवा : सुदानमध्ये अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरिकांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील सरसावले आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी लक्ष देऊन योग्य पावले उचलण्याची मागणी जयंत पाटील यांनी परराष्ट्र मंत्र्यांकडे ट्वीटद्वारे केली आहे.

सुदानमध्ये सुरु असलेल्या देशातंर्गत युध्दामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरिक अडकले आहेत. भारतीय दूतावासाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणापासून सुमारे १२०० किलोमीटरवर हे नागरीक आहेत. परराष्ट्र खात्याकडून ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जात आहे. आतापर्यंत काही भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news